लिहीते व्हा!

आपल्या आजूबाजूच्या  गोष्टींचे गहीरेपण जेव्हा माणसाला कळतं तेव्हा लिहावंसं वाटत. लिहीताना मनात घोळत असलेला विचार व भावना कागदावर उमटतात तेव्हा मेंदूतली जागा रिकामी झालेली जाणवते. जरा हलकं वाटतं. मनातील कल्पना लिखानाच्या रूपात शब्दामध्ये उतरतात.

स्वतःचे विचार लिहीण्यासाठी आपल्याला स्वतःच्या बुध्दीचा वापर करावा लागतो. अर्थात ते स्वतः लिहावं लागतं. आणि आपण पुन्हा चेक करतो आपण लिहीलेलं बरोबर आहे की नाही. त्यातूनच कदाचित चांगली कलाकृती निर्माण होते.

दुसऱ्यांनी लिहीलेलं काॅपी करण्यापेक्षा आपण स्वतः का लिहावं ? मी स्वतः स्टाॅपवाॅच हे पुस्तक लिहीण्यापूर्वी एअरपोर्टची अनियमित दिनचर्या अनुभवली होती. डे नाईट आॅफ बऱ्याचदा रात्रभर जागावं लागायचं. दुसऱ्या दिवशी जबरदस्तीने झोपावं लागायचं. अशा पध्दतीने दिनक्रम सुरू असताना मी डाॅ अभय बंग यांना माझे प्रश्न विचारले. यावर काही टिप्स दयाल का? अशी त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं ‘‘बघ संजय माणूस ज्या परिस्थीतीत असतो त्याच परीस्थीतीत त्याने स्वतः प्रश्न काढले आणि त्यावर उत्तरं शोधली तर उत्तरं नक्कीच मिळतात आणि त्यातूनच जन्माला आलं ‘स्टाॅपवाॅच.’

लिखाण करणं ही देखील एक उपचार पध्दती( थेरेपी) आहे. संशोधकाच्या म्हणण्यानुसार आपलं लिखान व कविता मेंदूला रिफ्रेष करते. कविता किंवा लेख लिहीण्याचा एक आरोग्यदायी गुण म्हणजे आपल्या भावना लिखाणातून  निचरा झाल्यामुळे घुसमट होत नाही. त्यामुळे लिहील्यावर   हलकं वाटतं. त्यासाठी आपलं लिखान किंवा कविता दर्जेदारच हवी असा काही नियम नाही. आणि हो एकदा का लिहायला सुरूवात केली की, सरावाने आपलं लिखानही सुधारत जातं की. तेव्हा मग आपणच मागे का? चला तर लिहीते होऊ या… आपल्या कडील ज्ञानाची शिदोरी वाचक मित्रांसाठी खुली करूया…

कारण या ग्रुपमध्ये काही डॉक्टर, साहित्यक, वकिल, पोलीस,  एअर लाईन्स अधिकारी, तंत्रज्ञ, कॉर्पोरेट ट्रेनर इत्यादी आहेत, आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा किंवा अनुभवाचा फायदा सगळ्यांनाच होऊ द्या. त्यामुळे आपल्याकडून लेख लिहिण्याची अपेक्षा आहे.

जे जे आपल्यासी ठावे, ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन

 

आपला संजय गोविलकर

पोलीस निरीक्षक, लेखक

आम्ही भारतीय!

आज देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे उलटली. तरीही जाती, धर्म, पंथ, यावरून दंगे व वाद होतच आहेत. आपली नेमकी हीच दुखरी नस तेंव्हा इंग्रजांना लक्षात आली होती. त्यांना कळलं हे लोक धर्मावरून कधीच एकत्र होणार नाहीत. त्यामुळेच त्यांनी भारतातील निरनिराळ्या धर्मांमध्ये भांडणे लावून दिली फोडा आणि राज्य करा हेच तर त्यांचं मुख्य धोरण होते. आणि म्हणूनच तर ते आपल्या देशावर 150 वर्षे राज्य करू शकले दुःखाची गोष्ट ही की आपण आज ही आप आपसात धर्मासाठी हाणामारी करून एकमेकांचे रक्त सांडतोय आणि याचा फायदा देशाच्या शत्रूंना होतोय. निरनिराळ्या जातीच्या मुखवट्या मागे आपण हे विसरलोच आहोत की आपण भारतीय आहोत।

जन्म घेतना नवजात बालकाला ही माहित नसतं की तो कुठे जन्माला येतोय पण जसं त्याचा जन्म होतो त्याच्या वर त्या त्या कंपनीचं प्रोडक्ट स्टिकर लावला जातो आणि मग त्याप्रमाणे त्याला नाव दिलं जातं. त्याचं रॅपर ही तशाच पद्धतीने पॅक होतं. आणि जन्मभरसाठी तो त्या कंपनीचा ब्रँड अंबिस्टर बनतो। यात धर्म जात व पोटजात यांचा पगडा माणसावर वज्रलेपसारखा चिकटतो तो अगदी जन्मापासून मृत्यू पर्यंत. त्यापेक्षा भयंकर म्हणजे सख्खा बाप मुलीने जाती बाहेर लग्न केले म्हणून तिचा सुरीने गळा चिरतो तेंव्हा जातीपातीची मुळं किती खोलवर रुजली आहेत याचा प्रत्यय येतो. जातपात, आरक्षण वरून होणारे वाद मोर्चे आपण पाहतोच आहोत.

आपल्या बाबतीत असे होऊ नये म्हणून मी व आपल्या जीवनरंग च्या सहकाऱ्यांनी आपापल्या मुलांची जात भारतीय म्हणून नोंदविली आहे। भारतीय हीच आमची जात आणि मानवता हाच आमचा धर्म हेच जीवनरंग चे मुख्य उद्दिष्ट आहे। हा विचार घेऊन जर आपण एकत्र आलो तर काहीतरी चांगले घडेल असं मला वाटतं.

घराबाहेर भारतीय हीच आमची जात आणि मानवता हाच आमचा धर्म असं जर का आपण करू शकलो. हा प्रयत्न आम्हीही करत आहोत कारण यामुळे येणाऱ्या पिढीला तरी ही जातीपतीची झळ बसणार नाही. आज भारताचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असेल काही लोकांनी दहशती पोटी दुकानं बंद ठेवली तर काहींनी उस्फुर्त पणे बंद ठेवली यातून आपण खरंच काही कमावलं का? असे बरेचसे प्रश्न निर्माण झाले.

आपल्या ग्रुपमध्ये निरनिराळ्या प्रकारचे तज्ज्ञ आहेत। तर आपण सर्व मिळून यावर काही तरी नक्कीच करू शकतो। आपणाकडून याबाबतीत कायदेशीर बाबी काय आहेत याबाबत माहिती हवी आहे. या बाबतीत आपल्याला काही करता येईल का? यावर सर्वांनी विचार विनिमय करूया.

धन्यवाद