जे जे विदेशी आणि इंग्रजी ते ते उत्तम?

 

साधारण 70 ते 80 च्या दशकापासून सुरुवात झाली एक पिढी परदेशात जायला आणि मग हळू हळू विदेशी वस्तुंचा भारतात वापर वाढू लागला. जी गोष्ट अगोदर चैन म्हणून बघितली जायची ती आता गरज झाली किंवा त्याची गरज निर्माण केली गेली.

मग त्यानंतर या विदेशी वस्तूंची फॅशन झाली. एखाद्याने आश्चर्याने विचारले अरे नवीन घड्याळ! की त्यावर उत्तर मिळायचे ‘imported आहे’.  अगदी शाळेतील मुलेही मग एकमेकांना भेटली की या इंपोर्टेड वस्तूंच्या आकर्षणातून गप्पा मारायला लागतात.मुलाचं सोडा पण पालकांच्या मनातही जे जे विदेशी ते ते उत्तम हेच ठासून भरलेल दिसतंय. विदेशी आकर्षणातून इंग्रजीतून शिक्षण देणाऱ्या संस्था आल्या या इंग्रजी माध्यमातील संस्था इंग्रजी विषयांपेक्षा इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देऊ लागल्या आणि आपण आपल्याच मुलांना इंग्रज बनवू लागलो. अशी शिक्षणपद्धती आपली मुले शिकू लागलीत ज्यात त्यांच्यातील नेतृत्वगुण तर वाढीस ह नाहीत पण कारकून मानसिकता मात्र प्रचंड वाढू लागली आहे.

खर तर प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे आणि त्याला आवडणारा विषयही वेगळा मग असे असताना आपली शिक्षणपद्धती का या मुलांना सर्व विषय शिकवण्याच्या जोखडात बांधून टाकते आणि मुलगा हुशार असण्याचा बेस त्याचे परीक्षेतील मार्कच असतात. जरा नीट विचार करून २/२/१८३५ रोजी लॉर्ड  मॅकोलेने त्यांच्या ब्रिटीश पार्लमेंटमध्ये केलेले वरील चित्रातील भाषण नीट वाचले तर नक्की लक्षात येईल की ज्या शिक्षणपद्धतीत आपण शिक्षण घेतले व आता आपली मुले घेत  आहेत  ते  गुलामगिरी  मानसिकता वाढवणारे शिक्षण . आपण संपूर्ण शिक्षणव्यवस्था बदलू शकत नाही पण आपल्या मुलापुरते तरी त्याला आवडणारे, ज्यात त्याला गती आहे ते देणारे, पालकांची आवड (३ IDIOTS मधील फरहान कुरेशीचे  बाबा हिटलर  कुरेशी सारखी ) न लादणारे शिक्षण दिले तर आपली पुढील पिढी   ही उत्तम नेत्यांची असेल अशी आशा करूया. आणि त्यासाठी जे जे विदेशी ते ते  उत्तम  म्हणण्यापेक्षा आपल्याकडेच जे जे आहे ते ते उत्तम आहे हे मानूया…

 

श्री. अतिश कुलकर्णी

(लेखक, प्रशिक्षक, वक्ता)

८१०८१०८४९२

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *