आयुर्वेद- समजुती व गैरसमजूती – भाग 2

दही… अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणखी एक विषय.. दह्याच्या बाबतीत देखिल खूप गैरसमजूती आहेत.. उदाहरणार्थ.. दही थंड आहे.. रोज जेवणानंतर खाल्लच पाहीजे..अदमुरे दही हे तर फारच उत्तम  इ. हे सर्वच गैरसमज आहेत.. आणि या गैरसमजूती मुळं आपण अनेकदा अनेक आजारांना बळी पडतो..

दही हे थंड नसून उष्ण आहे.. व पचनानंतर अम्लता उत्पन्न करणारे आहे..दही जेवणाबरोबर खाल्ल्यास जेवनाची रूची वाढवते, भूक वाढवते, शक्ति व स्नेहवर्धक स्थूलता उत्पन्न करणारे आहे.

दही हे उष्ण असल्याने उष्णऋतूंमधे म्हणजे शरद (october heat), ग्रीष्म (उन्हाळा), वसंत (January, February), या काळात खाऊ नये. अन्यथा ते उष्णता व रक्तदोष तसेच कफविकार वाढवणारे ठरते.

पूर्णतः लागलेले दही.. हे वात कमी करते (आमवात नाही), वीर्यवर्धक आहे..

अदमुरे दही तीनही दोष वाढवणारे आहे त्यामुळे हे मुळीच खाऊ नये..

(संदर्भः – च.सू.२७/२२५-२२८)

 

नीरोगी व्यक्ति ने देखिल दही खाताना खालिल नियम पाळावेत…

ते रात्री खाऊ नये, दिवसा देखिल खावयाचे झाल्यास तूप, साखर, मुगाचे कढण, मध किंवा आवळा यापैकी आपल्याला अनुकूल अशा गोष्टी बरोबर खाव्यात. तसेच ते कधीही तापवून खाऊ नये..

वरील नियम न पाळता खाणा-या व्यक्तीस ताप, उष्णतेचे विकार, रक्तदोष, त्वचा विकार , चक्कर येणे, कावीळ यासारखे आजार होण्याची शक्यता असते.

(संदर्भः- च.सू. ७/६१-६२)

 

दही आणि ताक यांचे गुणधर्म पूर्णतः भिन्न आहेत.. दह्यात नुसते पाणी मिसळून हालवले  म्हणजे ताक होत नाही, ते जेव्हा पूर्णतः घुसळून लोणी काढले जाते त्यावेळी शिल्लक राहीलेला द्रव पदार्थ म्हणजे ताक होय.( मला आलेल्या रूग्णानुभवानुसार सांगत आहे..)

त्यामुळे दही खा.. पण प्रमाणात आणि वरील नियम पाळूनच..

“आयुर्वेद जगा आणि निरोगी रहा”

 

 डॉ .गौरी सहस्रबुद्धे- साबळे ( एम्.डी.- आयु.)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *