आयुर्वेद चिकित्सेनुसार षड्रिपू
या अखिल चराचर जगतामधे प्रत्येक जीवंत प्राणिमात्रांमधे काही स्वाभाविक इच्छा दिसून येतात. ज्या वेळोवेळी आपल्याला जाणवतात. त्यांचे वेळेवर निराकरण करायलाच पाहिजे.उदा-भुक लागल्यावर जेवण करणे, तहान लागल्यावर पाणी पिणे, त्याचप्रकारे शिंका येणे, जांभई, झोप, वमन, अश्रू येणे, मल मुत्र वेग, श्वास वगैरे हे झाले शारीरिक वेग. यांचे निराकरण वेळेवर न झाल्यास अनेक शारीरिक रोगांन ते कारणीभूत होतात. म्हणूनच त्यांना अधारणीय वेग असे म्हणतात.
धारणीय वेग : आपलै शरीर निरोगी, निकोप राहण्याकरिता शरिराच्या काही इच्छांवर ताबा ठेवणे आवश्यक आहे. त्या इच्छांवर ताबा नाही ठेवता आला तर त्याव्यक्तिला स्वताला, समाजाला त्या हानिकारक ठरू शकतात. यांनाच मानसिक वेग वा षड्रिपू असे म्हणतात. या वेग प्रव्रूत्तीमुळे ती व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊन तिच्या हातून अनुचित कार्य घडू शकते. प्रत्येक व्यक्तीला शांत, समाधानी, सुखी जीवनाकरीता या अविचारी, अनुचित इच्छांवर ताबा मिळविणे आवशयक आहे. म्हणून उपचार करतांना निरोगी, स्वस्थ शरीर संपदा कायम राहण्याकरिता या सर्व गोष्टींचा विचार करायलाच हवा. हेच ते षड्रिपू, निरोगी शरीराचेसहा शत्रू.
- काम- वाईट इच्छा, वासना.
- क्रोध-हिंसा, कठोरता, संताप, अविवेक.
- लोभ – मोह, ईर्षा, अधिकाधिक जमा करणे.
- मद-मूजोरी,अहंभाव,उन्माद
- मत्सर-दुसर्याला दुःखी पाहून आनंदी होणे, चुगलू चहाडी करणे.
- अभिध्या-दुसऱ्याच्या मालकीची वस्तू, संपत्ती लुबाडून घेणे. चोरी करणे.
हे सर्व षड्रिपू स्वास्थ्याला हानिकारकच. त्यातील क्रोध हा रिपू बुध्दीला झाकोळून टाकतो. नेहमी अविवेकी असतो. आपला क्रोध म्हणजे दुसर्या च्या चुकीची शिक्षा स्वतः घेण.
राग, हिंसेच्या वेळी श्वासांची गती वाढते. श्वास गती जितकी जास्त तितकी शारिरीक, मानसिक आरोग्यास हानिकारकच.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगतांना या षड्रिपूंचे छान वर्णन केलेले आहे,
ध्यायतो विषयान् पूंसः
सञ्गस्तेषूप जायते
सडःगात् सञजायते कामः
कामात क्रोधोऽभिजायते
क्रोधात् भवती संमोहः
संमोहात स्मृती विभ्रम
स्मृती भ्रंशाद बुध्दिनाशः
बुध्दिनाशात् प्रणश्यति.
भावार्थ : फळाची आशा केल्यास असंतोष, असमाधान दिसून येते. आणि इच्छा चा स्वभावच आहे असमाधानी. इच्छा अशी विचित्र गोष्ट आहे की पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर मोह वाढतो. (लालसा). आणि एकदा का मोह उत्पन्न झाला की ती व्यक्ती सामाजीक नितीनियम सारं काही विसरुन जाते. त्याची बुद्धी, सारासार विचार शक्ति योग्य तर्हेने कामे करु शकत नाही. होणारी कामे चांगली होत नाहीत.
त्यामुळे समाजात त्या व्यक्तीला मान सन्मान मिळत नाही. समाज त्याला शत्रु सारखी वागणूक देते. आणि शेवटी त्या व्यक्तीचे सर्वार्थाने विनाश झालेला दिसून येतो. म्हणूनच या 6ही इच्छांना षड्रिपू म्हटले जाते.
ह्या रिपूंमूळे मनावर खूप ताण येतो. त्यामुळे घरी-दारी, कामावर लक्ष केंद्रीत होत नाही. परिवारातील मानसिक स्वास्थ्य विचलीत होते. हा तणाव दूर करण्याकरिता मेंदू, बुध्दी आणि मन ही 3ही इंद्रीय शांत असून त्यांच्यात संतूलन हवे. बुध्दी आणि मनामधे संघर्ष झाला तर त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. या संघर्षांतून अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक विकार सुरू होतात.
निरोगी, शांत, समाधानपूर्वक जीवन जगण्यासाठी “आयुर्वेद”
================
सहज वाचनात आले आणि आवडले म्हणून खाली देत आहे,
क्रोध या आपल्या शत्रु चे एक छान खानदान आहे. ते असे,
- भय – क्रोधाचा बाप.
- उपेक्षा – ची माता.
- जिद्द- बहीण
- अहंकार – क्रोधाचा मोठा भाऊ
- हिंसा – ची पत्नी.
- निंदा- मुलगी.
- वैर- मुलगा.
- ईर्षा – नकचढी सून
- तिरस्कार – क्रोधाची नात.
आहे ना क्रोधाचा भरा, पूरा, खानदानी परीवार.
आता त्याला किती साथ द्यायची ते तुम्ही ठरवायचं.
– डॉ. निलिनी चौधरी
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!