नाते
असणं आणि माननं , दोन खरंच खूप वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा एखादी गोष्ट आहे किंवा एखादे नाते आहे असे आपण मानतो तेव्हा तिथे असतो फक्त विश्वास, तो ही एकतर्फी. कारण, हे तुमचे मत आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी असेलच असे नाही. आणि असणं हे निसर्गतः किंवा जन्मतः मिळालेलं असतं. इथे सुद्धा विश्वास असतो पण त्या जोडीला असतो एक अधिकार , जो जन्मतः मिळालेलं असतो किंवा सामाजिक बांधिलकीने आलेला असतो.
जिथे आपण एखादे नाते आहे असे मानतो, तिथे असतो आदर, विश्वास!.. हो पण तिथे अंतर मात्र असतेच असते. तूम्ही माना अगर नका मानू. जसे हे माझे आई-वडील आहेत अथवा हे माझ्या आई-वडीलां सारखे आहेत. फरक काय ? , की असण आणि नसणं!! एकॆ ठिकाणी आदर आहे, श्रद्धा आहै, आपलेपणाही आहे.पण जो स्वतःच्या आई- वडीलां विषयी वाटतो तो असेल का हो?… मला विचाराल तर नाही.
असे बर्याच नात्यामध्ये पहायला मिळते. बर्याचदा ती ओढ असते रक्ताच्या नात्याची, तर बर्याचदा ती असते सामाजिक,नैतिक. प्रत्यक्ष वस्तुस्थिती स्विकारने गरजेचे आहे नाहीतर पदरात निराशेशिवाय काहीच पडणार नाही. आणि मग आपण दोष देतो त्या व्यक्तीला,नशिबाला, प्रसंगाना . पण जर का धोडा विचार करून , सुरक्षित अंतर ठेवून या नात्यांकडे आपण पाहिले तर न गुरफटता एका सुरक्षित ठिकाणी तुम्ही असाल.
वेळ धावतेय, ती कोणासाठी धांबते का? नात्यांचही असेच असते. तीही काळानुसार बदलतात, बदलू शकतात.मग, आपणही हे स्वीकारले तर त्रास नाही होणार.मृगगजळामागे धावण्यात काही अर्थ नाही. तहान तर भागणार नाहीच पण हवा आहे तो ओलावा , आत्ता मिळेल, आता मिळेल म्हणत म्हणत कोठे जाऊन पोहोचू कळणार ही नाही. मात पदरी पडेल फक्त निराशा आणि अपेक्षाभंगाचे दुःख. या सार्यांमध्ये वेळ जाईल तो वेगळाच.
मला वाटते, जर का प्रत्येकाने असा विचार करून एखाद्या नात्याकडे पाहिले…म्हणजेच जर का माननं महत्त्वाचे आहे असे वाटले तर तिथे अपेक्षा करून चालणारच नाही.आणि जर का हे माननं दोन्ही बाजूंनी तेवढ्याच तोडीचे असेल तर तिथे काही तरी नाते आहे असे म्हणता येईल.
पण, आपण मन नाही वाचू शकत. मग का विषाची परिक्षा घ्या? त्यापेक्षा जे आहे त्याचा स्वीकार करा.आणि आनंदी व्हा. आणि ते ही जमत नसेल तर नवीन नाते निर्माण करायला जाऊच नका.
हे प्रत्येकालाच जमेल असे नाही. पण वस्तुस्थिती जी आहे ती आहेच.स्वीकार करा. आणि आपले जीवन एक ध्येयपूर्ण बनवा. मृगगजळामागे धावण्यापेक्षा आपल्या ध्येयाच्या मागे धावा व आपले जीवन तर प्रकाशमय कराच!! आणि तोच प्रकाश इतरांच्याही कसा उपयोगी पडेल याकडे लक्ष द्या.
मानसी कोयंडे
नेरूळ
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!