भावनिक बुद्धिमत्ता – भाग १

आपण जर पाहिले तर व्यक्तिमत्व विकासाचे स्वरूप भावनात्मक (Emotional), बोधात्मक (Intellectual) आणि क्रियात्मक (Practical) या  क्षेत्रांशी संबंधित असते. आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास होण्यासाठी व या तीन क्षेत्रातील विकासासाठी योग्य प्रमाणात प्रयत्न होणे आवश्यक आहे. आज आपण भावनात्मक म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ताच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत.

 

यासाठी सर्वप्रथम समजून घेऊया कि भावना‘(Emotion) म्हणजे नक्की तरी काय?

‘भावना’ या शब्दाला इंग्रजीमध्ये ‘Emotion’ म्हटले जाते. मुळ लॅटीन शब्द “Emovere” या पासून Emotion केले. ज्याचा अर्थ उत्तेजित करणे असा होतो. त्यावरून असे म्हणता येते की, ‘भावना’ हे व्यक्तीच्या उत्तेजित अवस्थेचे नाव आहे.

 

भावनांची काही वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी चार खालीलप्रमाणे.

१. भावना विकीर्ण आहेत (Emotion is diffused)

२. भावना सतत असते (Emotion is persistent)

३. भावना संचयी असते (Emotion is cumulative)

४. भावनेचे स्वरूप प्रेरणात्मक असते (Emotion is inspirational)

 

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ?

डॅनियल गोलमन एक आंतरराष्ट्रीय मानसशास्त्रज्ञ आहेत जे भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर व्याख्यान देतात. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.

“Defined emotional intelligence as the capacity to recognize our own feeling and those of others for motivating ourselves and in our relationships.”

 

“स्वतःच्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आजूबाजूच्या व्यक्तींशी सुसंवाद साधता येणे, वागण्यात लवचिकता असणे, स्वयंप्रेरणेनुसार व जीवन उद्दिष्टानुसार काम करता येणे या सर्व गुणांच्या मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात.”

 

भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीमध्ये दोन घटक अप्रत्यक्ष कार्यरत असतात. भावनिकदृष्ट्या स्थैर्य (Emotional Stability) आणि भावनिक परिपक्वता (Emotional Maturity) असणाऱ्या व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून वर्तन करतात. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये समायोजन (Adjustment) साधण्यास प्रवृत्त असतात. या व्यक्ती स्वयंप्रेरणेनुसार कार्य करीत असतात.

 

व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडविण्यात भावनिक बुद्धिमत्तेची महत्वाची भूमिका आहे. वयापरत्वे भावनिक पक्वता येते. आजच्या या स्पर्धेच्या युगात अनेक ताणतणावांचे प्रसंग येतात. समस्या उभ्या राहतात. त्या सोडविण्याकरिता ‘स्व समायोजन (Self Adjustment) क्षमता अंगी असावी लागते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास हा मोठ्या प्रमाणावर त्याच्या भावनिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो. प्रत्येक व्यक्तीत काम करण्याची शक्ती, ऊर्जा, उत्साह असतो. तो भावनिक बुद्धिमत्तेमुळे मजबूत होतो.

 

धन्यवाद

समीर दत्ताराम पडवळ 

अर्थवेध वेल्थ संस्थापक

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *