वाघा बॉर्डर परेड … एक अविस्मणिय संध्याकाळ

भारतीय लष्कराविषयी असलेला सार्थ अभिमान आपण सर्व भारतीयांमध्ये ओतपोत भरलेला आहे… त्यात जर ती भारत पाकिस्तान सीमेवरील वाघा बॉर्डर असेल तर तो अजून ओसंडून बाहेर येतो…..

माझ्या आयुष्यात आलेला हा वाघा बॉर्डर स्टेडियमवरचा अतुलनीय, अभिमानास्पद क्षण………बॉर्डर,परेड, कवायती  व पलीकडले ‘ते’ लोक पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो मनात एक धाकधूक …..गाडीने जाताना लाहोर 23 किलोमीटर अशी पाटी वाचली व मन पुन्हा त्या कटू इतिहासात गेले …देशाला मिळालेलं स्वातंत्र्य,जाता जाता इंग्रजांनी केलेली फाळणी व एवढी वर्ष गुण्यागोविंदाने नंदणाऱ्या भारताचे झालेले 2 तुकडे व त्यानंतरचा रक्तरंजित इतिहास  हृदय हेलावून गेला…..खूप काही झेलले त्यावेळी आपल्या लोकांनी ..आठवूही नये असे वाटणारे…. त्यानंतर कायमस्वरूपी आलेली जहरी कटुता… लांबून दिसणाऱ्या 2 झेंड्यानी विचारांची तंद्री भंग केली …. उंच डौलाने फडकणार तिरंगा पाहून काय भावना दाटल्या शब्दात सांगणे कठीण ….समोरासमोर फडकणारा तिरंगा व पाकिस्तानी झेंडा बघून असेच वाटले की,

झंडा उंचा रहे हमारा

विजयी विश्व तिरंगा प्यारा…

स्टेडियम मधले वातावरण … अरे बापरे अगदी जत्राच जणू …हातात छोटे झेंडे,तिरंग्याच्या कॅप्स, गालाला तिरंगा अशा उत्साही वातावरणात अख्खे स्टेडियम भरून गेले होते… जिथून छान दिसेल अशी जागा पकडत आपले स्टेडियम न्याहळत आम्ही बसलो … नंतर हळूच ‘तिकडे’ नजर टाकली समोर पाकिस्तान गेट व  हिरव्या वेषातील पाकिस्तानी आर्मी .. आपले स्टेडियम भरलेले तर त्यांचे स्टेडीयम च्या मोजून 25 टक्के लोक आलेले…तिथून ते इकडे बघत होते व आम्ही सर्व तिकडे बघत होतो ….राग द्वेष तर नैसर्गिक होताच पण कधीतरी आपण एकत्र नंदलो आहोत ही आपलेपणाची भावना कुठेतरी नकळत डोकावून गेली……

अशा या ऐतिहासिक ठिकाणी आपल्याला सुद्धा काहीतरी परफॉर्म करता आले असते तर हा विचार मनात येऊन गेला … आणि भारताचा तिरंगा हातात घेऊन स्टेडीयमभर धावण्याची सुवर्णसंधी मिळाली…अभिमानाने व अत्यानंदाने ऊर भरून आला व आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले….अश्रू दाटले आले अवर्णनीय प्रसंग होता आयुष्यातला….

गणवेश धारी सीमा सुरक्षा दलाचे जवान व अधिकारी आले तेंव्हा उत्साहाची लाट आली जणू स्टेडियमवर…. वाह काय तो रुबाब… कवायती करून आपले जवान  जेंव्हा भारताच्या सीमा गेटजवळ गेले तेंव्हा आम्ही श्वास रोखले

त्वेषाने दरवाजे उघडले गेले दोन्हीकडून … त्यानंतरचा तो थरारक अनुभव … शेकहँड व  शक्ती प्रदर्शन ..सीमा सुरक्षा दलाचे जवान पाकिस्तानी जवानांसमो ज्या आक्रमकतेने परेड क कवायती करत होते त्याक्षणी स्टेडियम वरचा प्रत्येक भारतीय त्या जवानांमध्ये स्वतःला पहात होता…. भारत माता की जय, हिंदुस्तान झिंदाबाद, वंदे मातरम अशा घोषणा अगदी लाहोर  पर्यंत ऐकू गेल्या असतील…जवानांच्या  देहबोलीमध्ये काय राग आणि आवेष होता … कवायती संपल्यावर ध्वज उतरवून परेड ची सांगता झाली…

देशभक्तीने फुललेल्या व त्वेषाने घोषणा देणारा भारतीय परेड संपताच स्टेडियम सोडताना मात्र कचरा तसाच टाकून बेशिस्तपणे निघून गेला त्यावेळी मात्र कुठे गेले देशप्रेम ???देशप्रेम फक्त पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात ,क्रिकेट च्या सामन्यात… बाकी आम्ही आहे तसेच बेफिकीर आहोत हे सिद्ध करून गेले..

सलाम त्या जवानांना …भारतीय सीमा सुरक्षा दल काय काम करतात हे सर्व !!!!ज्यांच्यामुळे आपण आनंदी व सुरक्षित आयुष्य जगतोय..जवानांच्या बलिदानावर लिहिलेले एक वाक्य घायाळ करून गेले

शहिदोंकी चितांओ पर लगेंगे हरवर्ष मेले!!!!!

 

धनश्री परब

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *