आयुर्वेद समजुती आणि गैरसमजूती भाग -३

पृथिव्याम्  त्रीणि रत्नानि जलम् अन्नं सुभाषितम्…।

मूढै: पाषाणखण्डेषु रत्न संज्ञा विधीयते ..।

( अर्थ: पृथ्वी वर केवळ तीनच रत्न आहेतजल, अन्न आणि सुभाषित परंतु सामान्यव्यक्ती मात्र दगड़ान्नाच रत्न समजतो)

 

केवळ आपल्या आयुष्यातच नाहीं तर साहित्यात सुद्धा पाण्याला अनन्य साधारण महत्व आहें.. वरील सुभाषितात तर पाण्याला रत्नाची उपमा दिलेली आहें.. म्हणून हा विषय निवड़त आहें.

खरंतर पाणी म्हणजे जीवन … पण हेच पाणी जसे प्रमाणात घेतल्यावर अमृताप्रमाणे आहे तसेच ते अति किंवा अत्यल्प प्रमाणत घेतले तर विषसमान ठरू शकते. त्याच पाण्याविषयीचे विवेचन आता करत आहे.  पाणी या विषयाबद्दल सुद्धा असेच अनेक ग़ैरसमज आहेत. पाणी किती प्यावे, जेवणाच्या आधी प्यावे की नंतर प्यावे , की जेवतना मधे मधे प्यावे, उठल्या उठल्या अनशापोटी किती पाणी प्यावे …इ.. या सम्बन्धी अगदी सोपा नियम म्हणजे जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी पीणे, जेव्हा तहानेची जाणिव होत नाहीं तेव्हा पाणी पीऊ नये. अती तहान लाग़णे किंवा अजीबात तहान न लाग़णे हि आजाराची लक्षणे आहेत. त्याविषयी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.

 

  1. जेवताना पाणी पिण्यासंबंधीचे नियमजेवणाच्या आधी पाणी प्यायल्याने माणूस कृश होतों. तसेच आम निर्मितीचे कारण होऊ शकते (indigestion) जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने माणूस स्थूल होतों त्यामुळे निरोगी माणसाने निरोगी राहण्यासाठी जेवताना मधे मधे थोड़ेथोड़े पाणी प्यावे या साठीचा अगदी साधासोपा दाखला.. मिक्सर मधे चटणी बारीक करताना अधिच खूप पाणी घातल की त्यातिल घटक पदार्थ नीट बारीक होतच नाहीत. तेच नंतर पाणी घातले तरी ती नीटशी मिळून येत नाहीं, पण तेच ज़र  बारीक क़रताना मधेमधे पाणी घातल तर ती एक सारखी बारीक होते. त्यामुळे निरोगी राहण्यसाठी जेवताना मधे मधेच पाणी प्यावे. अजूनहीं असेच काही ग़ैरसमज आहेत

 

  1. खूप पाणी प्यायल्याने त्वचा ताज़ेलदार दिसते..body detoxify होते ..या साठी अज़ून एक दाखला: कुंडित आपण जेव्हा एखादं रोप लावतो, तेव्हा रोज़ थोड थोड पाणी घालतो. एकदम तजेलदार दिसावं म्हणून पहिल्याच दिवशी खूप पाणी घातलं तर काय होईल. ते झाड़ सडून जाईल. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहें, म्हणून तहान लागलेली असेल तेव्हा आणि तहान भागेल इतकेच पाणी प्यावे. कारण पाणी प्यायल्या नंतर देखिल त्याचे पचन व्हावे लागते. अधिक पाणी घेतल्यामुळे पचन संस्थेवर अधिक ताण येतो आणि पचन संस्थेचे आज़ार उद्भवतात.

 

  1. अति पाणी प्यायल्याने बॉडी डीटॉक्सिफ़ाई होण्याऐवजी आपण अपचनामूळे निर्माण होणारे आमविष मात्र ओढावून घेतो.

 

  1. अत्यल्प पाणी प्यायल्याचे सुद्धा असेच तोटे आहेत बरं का? : तहान लागलेली असताना सुद्धा पाणी न प्यायल्याने शरीरशोष (dehydration), अंगासाद (अशक्तपणा), बधिर्य (कमी ऐकू येणे), मुर्छा, चक्कर येणे, हृदयरोगापर्यन्तचे सुद्धा दुष्परिणाम दिसू शकतात..

 

अजूनही पाणी आणि त्याचे उपयोग या विषयावर सांगण्यासारखे खूप आहें.. त्यामुळे पाणी प्यायलेच पाहिजे पण प्रमाणातच!

 

तुमची आता पर्यंतची पाणी पिण्याची पद्धत काय होती?

यापुढे या पद्धतीत काय बदल कराल?

 

आयुर्वेद जगा आणि निरोगी रहा

डॉ. गौरी साबळे ( एम डी आयुर्वेद, पुणे)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *